मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण
धन्यवाद
मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे.
सर्व प्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सन दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.
१५ ऑगस्ट१९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळीच्या ५६५ पैकी ५६२ संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली आणि तशी कार्यवाही पण केली. मात्र जम्मू-काश्मीर, हैदराबाद संस्थान, व जुनागढ संस्थान हि तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. मीर उस्मान अली खान सिद्दिकी, असफ जाह सातवा ( जन्म ६ एप्रिल १८८६, मृत्यू २४ फेब्रुवारी १९६७ ) हा हैदराबाद आणि बरारचा शेवटचा निजाम होता. सन १९११ आणि १९४८ च्या दरम्यान त्याने हैदराबाद संस्थानावर राज्य केले. २६ जानेवारी १९५० रोजी हैदराबाद हे भारतातील नवे राज्य बनले. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाल वंशाचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासठी स्वामी रामनंद तीर्थ यांच्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थानातील लोक मुक्ती संग्रामात सामील झाले होते.
हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी ६० लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येतो, मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एम-आय-एम ) या संघटनेच्या माध्येमातून रझाकार नावाने मुस्लीम स्वयंसेवकांची भरती केली आणि त्यांच्या मदतीने जनतेवर अतोनात अत्याचार सुरु केले होते.
मुक्ती संग्रण याचं नेतृत्व रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, इत्यादी नेत्यांनी मुक्ती संग्रामाचे नेतृत्व केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा