पोस्ट्स

छत्रपती शिवाजी महाराज. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

इमेज
 शिवरायांचे अष्टप्रधान  मंडळ  स्व सामर्थ्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालवा. स्वराज्यप्रती जनतेची आणि परकीयांची चांगली भावना असावी. त्यांच्या आणि स्वराज्यात सुसंवाद रहावा अशा अनेक कार्यासाठी राजांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. राज्याभिषेकासमयी या आठ प्रधंनाची पगारी नेमणूक करण्यात आली होती. १) पेशवा / पंतप्रधान          हा  सर्वात जबाबदार प्रधान असून मुलुकी आणि लष्करी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम त्याकडे सोपविले होते. त्यादृष्टीने राजपत्रावर शिक्का मारण्याचा त्याला अधिकार होता. राजाच्या आदेशा प्रमाणे प्रदेशाची व्यवस्था लावणे. प्रदेशाचे संरक्षण करणे आणि स्वतः युद्ध प्रसंगी हजर राहणे ही अत्यंत महत्वाची काम प्रधानाकडे सोपविली होती.राज्याभिषेक प्रसंगी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पंतप्रधान म्हणून नेमले.  २) अमात्य         हा दूसरा महत्वाचा प्रधान असून त्याच्याकडे राज्याची अर्थव्यवस्था पाहण्याचे काम सोपविण्यात आले होते. शिवाय युद्ध प्रसंगाला त्यालाही रांनागणावर हजर राहावे लागत असे...

शिवाजी महाराजांचा कौटुंबिक परिचय .

इमेज
  शिवाजी महाराजांचा कौटुंबिक परिचय .  शिवाजी महाराजांनी एकंदर ८ विवाह केले. या ८ राण्यांची नावे पुढील प्रमाणे आहे.  १) सगुणाबाई  २) सईबाई ३) सोयराबाई  ४) पुतळाबाई   ५) लक्ष्मीबाई  ६) सकवारबाई  ७) काशीबाई ८) गुणवंताबाई.  महाराजांना २ मुले होती १) संभाजी २) राजाराम. राज्यभिषेकाच्यावेळी महाराजच्या ४ राण्या ह्यात होत्या. संभाजी ची आई सईबाई तो केवळ अडीच वर्षाचा असताना मरण पावली. राज्याभिषेक होण्याप्रसंगी पट्टराणि होण्याचा मान सोयराबाई स मिळाला; परंतु युवराज होण्याचा मान संभाजी ला मिळाला. त्यातून रायगडावर तंटे बखेडे सुरू झाले.शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर जवळजवळ १ महिन्यांनी राणी पुतळाबाई सती गेली. शिवाजी महाराजांना ६ मुली होत्या. या सर्व मुलींचे विवाह मानांकीत घराण्यातील पुरुषांशी झाले.परंतु शिवाजी महाराजांचा एकही जावई त्यांच्या स्वराज्य कार्यात सहभागी झालेला आढळून येत नाही. शिवाजी महाराजांची आई जिजाबई ही महाराजांच्या राज्याभिषेकापर्यन्त म्हणजे जून १६७४ पर्यंत हयात होत्या. आपल्या मुलाला सिंहासनावर बसल्याचे पाहून त्या माऊली च्या आनंदाला पारा...

जाणता राजा शिवाजी महाराज यांचे चित्रण

इमेज
                              जाणता राजा शिवाजी महाराज यांचे चित्रण                    १७  व्या शतकात जन्माला आलेले छत्रपती शिवराय हे चमत्कारिक पुरुष आहेत असे तत्कालीन समाजाला वाटले होते. याचा अर्थ असा की, चार मुस्लिम शाह्या भारतावर राज्य करीत आहेत. येथील चारही वर्णातील लोक या शाह्यांची नोकरी किंवा गुलामी करण्यात धन्यता मानत आहेत. याच नोकर्‍या मिळवण्यासाठी ते आपसात संघर्ष करीत. अनेक तुकड्यामध्ये या लोकांना विभागण्यात या मुस्लिम राज्यकर्त्यांना यश आले होते.  सर्वत्र हाहाकार माजला होता. शेतकर्‍याला दुष्काळणे आणि या राज्यकर्त्याणे छळल्यामुळे  शेतकर्‍यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती.  स्त्री यांची सुरक्षा धोक्यात आली होती. धार्मिक जीवनात सर्वत्र अंधकार माजला होता. जबरदस्तीने धर्मांतर करवून आणले जात होते. मंदिरे पाडून त्या ठिकाणी मुस्लिम राज्यकर्ते मशिदी  बांधत होते. सातराव्या शतकाची सकाळ भगवंताची आरतीने होते नसून नमाजाच्या आवाजाणे होते होती. ...