पोस्ट्स

एप्रिल १८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भगवान महावीर ( "अहिंसा परमो धर्म " )

इमेज
                                                                 भगवान महावीर              "अहिंसा परमो धर्म "  संपूर्ण विश्वामध्ये धर्म हा जीवाला कल्पवृक्षा प्रमाणे सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे. प्रत्येक प्राणिमात्राला दुःखरूपी संसारसमुद्रातुन तारणारा आहे. 'हे भव्य जीवांनो सर्वांनी धर्माचे पालन करून सतत धर्मचरणामध्ये लिन होऊन त्या प्रमाणे आचरण करून शुभ आणि  शुद्ध भाव ठेवून शाश्वत अशा मोक्ष सुखाची प्राप्ती करून घ्यावी ' हि भगवंताची दिव्या वाणी आहे. सध्या स्थितीत मानवामध्ये स्वार्थी,  हिंसक,लोभी वृत्ती सतत वाढत चाललेली आहे. अधिक अधिक   ,कसे मिळेल, सत्ता भोगविलास इ. यासाठी च सर्व जीवनउर्जा संपविली जात आहे. वचन भाषणाला आता  किंमतच  राहिलेली नाही. बोलण्याने कोणाची मने दुखावतील, तर कोठे वैर, द्वेष उत्पन्न  होईल,याची आता भीतीच राहिलेली नाही. मायाचारी इतकी अं...

नासा चा तिसरा चमू

 नासा चा तिसरा चमू  'स्पेस एक्स '  ने अंतराळात पाठविला तिसरा चमू ,  एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स ने अमिरेकेच्या अंतराळात संशोधन संस्थेच्या ( नासा) चार आंतराळवीरांना अंतराळात पाठविले. सुमारे २४ तास प्रवास करून ते आंतरराष्टीय स्पेस स्टेशनवर दाखल होतील.          चारही अंतराळवीर  स्पेस एक्स मध्ये ६ महिने मुक्कामी राहणार आहे.   स्पेस एक्स तर्फे  पाठविण्यात आलेला हा तिसरा चमू आहे.    यासाठी स्पेस एक्स ने जुन्या ड्रॅगन या अंतराळ वाहनात काही किरकोळ दुरुस्ती व बदल करून पुनर्वापर केला.  या वाहनाचा यापूर्वी  अंतराळवीरांना पाठविण्यासाठी वापर करण्यात आला होता.    या वेळी पाठविण्यात आलेले अंतराळवीर अमेरिका, जपान, आणि फ्रांस चे आहेत.  यापैकी फ्रांस चे थॉमस पेस्केट  हे स्पेस एक्स च्या वाहनात प्रवास करणारे पहिले युरोपियन ठरले आहेत.  वर्षभरात च स्पेस एक्स ने तीन चमू स्पेस स्टेशनवर पाठविले आहेत..... 

मृत्यूनंतर

' मरणात  खरोखर जग जगते...'. वारंवार वाचणार्याला या वाक्यात विरोधाभास आठवले . मरणामुळे जगातल्या व्यक्ती नामशेष होतात, स्मृतीतून देखील त्या नाहीशा होतात.परंतु येथे कवी म्हणतो की, मरणाने तर जगातील व्यक्ती जगतात. खोल विचार केला तर त्याचे म्हणणे खरे आहे! मरणानंतर च माणसाला अमर पद मिळते . परंतु सामान्य माणूस मृत्यूनंतर विसरला जातो. पण सत्कार्यसाठी मरण आले , तर त्यामुळे मनुष्य अमर होतो.      पण हे अमर पद  मिळवण्यासाठी माणसाला त्याग करावा लागतो , त्याशिवाय कीर्ती मिळत नाही.चंदन स्वतः झिजते व दुसऱ्याला सुगंध देते. सर्वस्वाचा त्याग चा नव्हे तर  आत्मयज्ञ करायला माणसाने तयार राहिले पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे । या सामर्थ्य च्या उक्तीतही हीच गोष्ट सांगितली आहे. मृत्यू मुळे शरीराने मनुष्य नाहीस झाला , तरी त्याने केलेल्या बहुमोल कार्यासाठी तो कीर्ती रूपे तो जिवंत राहतो. संभाजीने धर्मा साठी मृत्यू परकरला , लोकमान्य टिळक , महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सारख्या त्यागी देशभक्तांच्या प्रचंड देश कार्यामुळे आज त्यांच्या स्मृती आपण अहनिर्षं जगवितो आहोत. मृत्...

सांस्कृतिक शब्दांच्या मागे अनेक महावंशाच्या इतिहास

इमेज
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शब्दांच्या मागे अनेक महावंशाच्या इतिहास उभा  आहेत. स्थलमात्राभोवती अनेक महाकृत्यांची स्मारके उभी आहेत. महाराष्ट्राने भारतात ठिकठिकाणी मिळवलेल्या विजयाची चिन्हे अटकेपासून मद्रासपर्यंत आणि काठेवाड पासून कलकत्त्या पर्यंत अजून अस्थित्वात आहेत. भारतावर राजकीय व सांस्कृतिक परचक्रे आली तेव्हा त्यांचे निवारण व निर्मूलन महाराष्ट्राने केले आहे . शकपूर्व कालापासून ही महाराष्ट्राची परंपरा आहे. स्वतंत्र लक्ष्मीची पूजा महाराष्ट्राइतक्या एकनिष्ठतेने हिंदुस्थानातील दुसऱ्या कोणत्याही प्रदेशाने केलेली नाही. ग्रीक, शक,  व कश्यप यांच्यासारख्या परक्याच्यांच नव्हे तर खरवेल व हर्षवर्धन यांसारख्या स्वकीयांची ही आक्रमनाला महाराष्ट्राने धीराने तोंड देऊन हरवले आहे .

साताऱ्याची प्रियांका

 साताऱ्याची प्रियांका अन्नपूर्णा शिखरावर  अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा विक्रम प्रियांका मोहिते हिने आपल्या नावे केला.  बर्फाने आच्छादलेला रस्ता पांढरे शुभ्र चकचकीत पर्वत क्षणात शेजारून जाणारा एखादा गोळा ह्रदयाचा ठोका चुकवत होता. गुडघाभर बर्फातून पाय उचलत, स्वतःला सावरत एक एक टप्पा सर करतांना अन्नपूर्णाच्या शिखरावर पोहचायचंच होतं. अडचणी आल्यावर पण १६ एप्रिल २०२० शिखराच्या अत्युच्च टोकावर पोहचले.      कोणताही विक्रम करण्याचा इरादा नव्हताच. पण या शिखरावर हि पोहचणारी पहिली भारतीय महिला ठरेल.  प्रियांका मोहिते सांगत असते. अन्नपूर्णा शिखरावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा विक्रम तिने केला, आणि तिच्याशी बोलतांना उलगडत गेली साहसाची कहाणी ? ... .. .... ... .. 

मंगळावर हेलिकॉप्टर चे उडान

 मंगळावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर चे ३० सेकंद उड्डाण  " अभिमानास्पद" ' नासा ' च्या यशामागे भारतीय वंशाचे ---डॉ.जे.बॉब बलराम --- अमिरीकेची अंतराळ संशोधन संस्था ' नासा' ने १९ एप्रिल रोजी मंगल ग्रहावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर उडवून इतिहास घडवला.       पहिल्यांदाच हे हेलिकॉप्टर किंवा रोटरक्राफ्टला पृथ्वी वरून नियंत्रित केले गेले. या हेलिकॉप्टर च्या मागे भारतीय वंशाचे वैज्ञानिक डॉ.जे.बॉब बलराम यांची बुद्धिमत्ता आहे. मूळचे दक्षिण भारतातील बलराम ' नासा' च्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत काम करत आहेत.  बलराम यांनीच इंजिन्यूटी हेलिकॉप्टर बनविले असून , ते या मार्स हेलिकॉप्टर मोहिमेचे मुख्य अभियंता आहेत.            बलराम यांना विचारले गेले कि, "मंगळ ग्रहावर इंजिन्यूटी  हेलिकॉप्टर फक्त ३० सेकंदासाठीच का उडाले ? ३०  सेकंदांचे उड्डाण घेतल्यानंतर इंजिन्यूटी  हेलिकॉप्टर परत मंगळाच्या पुष्ठभागावर उतरले"  या वर बलराम यांनी सांगितले कि , मंगळाच्या वायुमंडळात कोणतीही वस्तू उतरवणे आणि उडवणे फार कठीण  आहे. कारण तेथील वायुमंडळ पृ...

होणार रहस्यांची उकल

 सुपर सुपर कॉम्पुटरद्वारे होणार रहस्यांची उकल आयआयटीत वैज्ञानिक करणार संशोधन  भूकंप, जलवायू , परिवर्तन , आकाशगंगा - सारख्या रहस्यावरील पडदा आता आयआयटी(कानपुर) दूर करील.  जी रहस्ये आतापर्यंत कोणाला उलगडली नाहीत त्याबद्दल वैज्ञानिक संशोधन करून सांगतील. हे संशोधन देशाच्या पहिल्या सुपर सुपर कॉम्प्युटर च्या माध्यमातून होईल. हा कॉम्पुटर येथील आयआयटीत ( कानपूर ) बसविण्यात आला आहे . कारण या संशोधनात सुपर कॉम्प्युटर पेक्षाही अनेक पट जास्त गतीची गरज होती.           हा सुपर सुपर कॉम्प्युटर १.३ पेटा फ्लॉप च्या गतीने चालणार आहे . आय आय टी सतत नवे संशोधन करून समाजाच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. आता वैज्ञानिक न सुटलेल्या नैसर्गिक आपत्तींवर संशोधन करीत आहेत . यासाठी संस्थेत सुपर सुपर कॉम्प्युटर तयार आहेत.. " या सुपर सुपर कॉम्प्युटर वर फक्त वैज्ञानिक संशोधन करणार नाहीत, तर  संस्थेसह अनेक शिक्षण संस्था च्या विद्यार्थ्यांनाही लाभ मिळेल. त्याला इंटरनेट च्या माध्यमातून ही वापरले जाईल. आय आय टी नंतर ( कानपुर ) सुपर सुपर कॉम्प्युटर ला आय आय टी ( रु...

देशातील पहिले तरंगते टर्मिनल.

  देशातील पहिले तरंगते टर्मिनल महाराष्ट्रात         प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने सागरी क्षेत्रात ही आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.          देशातील पहिले तरंगते टर्मिनल उभारण्याचा बहुमान महाराष्ट्र राज्याने पटकावला आहे.       द्रवरूप नैसर्गिक वायू चे देशातील पहिले तरंगते टर्मिनल जयगड बंदरात उभारण्यात आले असून , त्यातून वार्षिक ६ कोटी टन वायू उपलब्ध होऊ शकेल . इंधनातील नैसर्गिक वायूचे मिश्रण ६ टक्क्यावरून १५ टक्क्यांवर नेण्याचे केंद्र सरकार चे धोरण आहे . रत्नागिरीतील जयगड मध्ये तरंगते टर्मिनल उभारले आहे. क्षमता किती..? १.७० लाख घनमीटर या टर्मिनलची क्षमता आहे. ७५ कोटी घनफुट दररोज नैसर्गिक वायू तयार केला जाऊ शकतो . त्यानंतर हा घनरूप  वायू दाभोळच्या विशेष वाहिनीद्वारे  पुरवला जाईल. भारताचे नैसर्गिक वायूबाबतचे अवलंबित्व कमी होईल असा विश्वास आहे...

दिल्ली कडक बंद

 दिल्ली चे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले , हम होंगे कामयाब ......... दररोज २५ हजारांवर नवे कोरोना बाधित येत आहेत.हा प्रकोप असाच राहिला , तर आरोग्य व्यवस्था सांभाळणे अशक्य होणार असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या सोमवार पर्यंत दिल्लीत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे .. नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर केजरीवालांनी दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव मांडत लॉकडाऊन चा निर्णय जाहीर केला दिल्लीतील 2 कोटी लोक एकत्र येऊन लढा देऊ आणि या चौथ्या लाटेस  ही आपण थोपवून धरू ....हम होंगे कामयाब.....असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला ...