तोरणगडावर विजय..

  इ.स.१६४७  मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला  तोरणगड  जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढणा  सिंहगड  , आणि  पुरंदर  हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी  राजगड असे ठेवले शिवाजीराजांच्या यशस्वी स्वाऱ्या बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली.शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन  फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर  फत्तेखानाचा पराभव केला.  बाजी पासलकर  सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.


शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा  मुरादबक्ष ) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.  त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना  कोंढणा किल्ला, आणि शहाजीराजांना   बंगळूर  शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.