माध्यमिक स्तरावरील इतिहासाचा अभ्यासक्रम
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ व राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० या नवीन शैक्षणिक आराखड्यानुसार आणि राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा २००९ प्रमाणे महाराष्ट्र उच्च शिक्षण मंडळाने विद्यार्थी केंद्रित शिक्षण या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता १२ वी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाची रचना व मांडणी आकर्षक पद्धतीने केली आहे. या या अभ्यासक्रमात १० गाभाघातक, मुल्ये, इतिहास अध्ययन व अध्यापनाची उद्दिष्ट्ये, जीवन कौशल्ये यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
आजपर्यंत उपयोजित इतिहास या विषयाबद्दल फारसे लिखाण झालेले नव्हते म्हणून मंडळाने हा एक नवा धाडसी निर्णय व विचार प्रत्यक्षात अमलात आणलेला आहे. आजच्या स्पर्धा युगात उप्यीजीत अभ्यासक्रमातून भूतकाळातील घटनांच्या पार्श्वभूमीवर वर्तमानाला सामोरे जाण्याची आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. तसेच जागतिकीकरण, निकोप राष्ट्रवाद,स्त्री - पुरुष समानता, अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध सक्षमपणे उभे राहण्याची वृत्ती आणि संगणक व स्पर्धाला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे हेच नवीन अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा