अंत नसलेल्या गोष्टीचा अंत
अंत नसलेल्या गोष्टी चा अंत कसा करायचा हाच खरा प्रश्न आहे,
पण या जगात प्रत्येकाचा अंत निच्छित आहे.
आता पर्यंत जर अंत नसलेली एखादी गोष्ट असेल तर ती फक्त ब्रम्हांड च आहे.
कि जिचा अंत निच्छित झालेला नाही. ती अनंत आहे. पण तिला हि कुठे तरी अंत असेल
कारण या विश्वात प्रत्येकाचे एक आयुष्य आहे. जे कधी ना कधी संपणार आहे.
त्या मुळे या विश्वात या ब्रम्हांडाचा हि अंत सापडेलच,
फक्त शोध घेण्याची गरज आहे.
आणि ती शोध घेण्याची सवय माणसाला काही करता शांत बसू देत नाही.
माणसाने शोध घेऊन पृथ्वीचा अंत कसा होणार या बद्दल
तर्क वी तर्क जोडले आहेत.
पण खरे कारण आणखी समोर आले नाही
कि, या पृथ्वीचा अंत कसा होणार
प्रगती करण्याच्या नादात आपणच
या पृथ्वीचा अंत करतो कि काय असा प्रश्न पडला आहे.
कारण आपली संशोधन करण्याची जी गती आहे.
ती फार अफाट आहे.
आपण फार कमी वेळेत खूप काही शोधून काढू शकतो.
आपले प्रगत विज्ञान हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.
आपण करत असलेले प्रयोग खरच माणसाच्या गरजेचे आहे का ?
कि खरच मानवाला त्याचा काही फायदा होणार आहे ?
पण आज पर्यंत हेच सिद्ध झालं आहे.
कि माणसाने केलेले प्रत्येक प्रयोग हे माणसाला घातक ठरले आहे.
माणसाचा अंत नेमका कशात आहे.
विचार केला तर ,,,,,,,
अंत नसेल तर तो फक्त
माणसाच्या विचारांना
माणसाची विचार करण्याची क्षमता इतकी अक्षम्य आहे कि,
तीला कोणती हि सीमा नाही.
ती अनंत आहे.
पण माणसाचे शरीर हे काल चक्रात बांधले गेले आहे.
त्याला मात्र मर्यादा आहे.
ते फार काळ टिकणारे नाही.
आणि त्यामुळे माणसाच्या विचार करण्याच्या शक्तीला कुठे तरी
मर्यादा निर्माण होते.
आणि या मर्यादेला आपण आपल्या भाषेत अंत असे म्हणू शकतो.
पण वास्तविक्तः
अनंत असलेली विचार सारणीचा कधीही अंत होत नाही.
आपल्याला वाटते कि,
आपला जन्म झाला तेव्हा पासुन
आपल्या आयुषची सुरुवात झाली.
पण तस नाही,
आपला जन्म होण्याआधी पासून
आपल्या आयुष्याची सुरुवात झालेली असते.
फक्त हे आपल्याला माहित नसते.
आणि त्यामुळे आपल्याला संघर्ष करावा लागतो.
पण
संघर्ष हा जीवनातील अंतिम सत्य आहे.
आणि माणसाने पूर्ण ताक्तीनिशी त्याच्याशी लढले पाहिजे.
शेवटी काय तर अंत नसलेल्या गोष्टी चा अंत कुठे च नाही.
जर तुम्हाला काही सुचत असेल तर नक्की काळवा.
एकदम उत्कृष्ट
उत्तर द्याहटवा