शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ
शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ
स्व सामर्थ्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालवा. स्वराज्यप्रती जनतेची आणि परकीयांची चांगली भावना असावी. त्यांच्या आणि स्वराज्यात सुसंवाद रहावा अशा अनेक कार्यासाठी राजांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. राज्याभिषेकासमयी या आठ प्रधंनाची पगारी नेमणूक करण्यात आली होती.
१) पेशवा / पंतप्रधान
हा सर्वात जबाबदार प्रधान असून मुलुकी आणि लष्करी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम त्याकडे सोपविले होते. त्यादृष्टीने राजपत्रावर शिक्का मारण्याचा त्याला अधिकार होता. राजाच्या आदेशा प्रमाणे प्रदेशाची व्यवस्था लावणे. प्रदेशाचे संरक्षण करणे आणि स्वतः युद्ध प्रसंगी हजर राहणे ही अत्यंत महत्वाची काम प्रधानाकडे सोपविली होती.राज्याभिषेक प्रसंगी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पंतप्रधान म्हणून नेमले.
२) अमात्य
हा दूसरा महत्वाचा प्रधान असून त्याच्याकडे राज्याची अर्थव्यवस्था पाहण्याचे काम सोपविण्यात आले होते. शिवाय युद्ध प्रसंगाला त्यालाही रांनागणावर हजर राहावे लागत असे. शिवाजी महाराजांनी प्रथम नारो नीळकंठ व नंतर रामचंद्र नीळकंठ यांना आमात्य पद बहाल केले होते.
३) सचिव
तिसरा प्रधान म्हणजे सचिव. राजकीय पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी, तसेच नव्याने जिंकलेल्या प्रदेशाची जबबदारी देण्यात आली होती. महाराजांनी अण्णाजी दत्तो यास सचिव म्हणून नेमले होते.
४) मंत्री
चौथा प्रधान म्हणजे मंत्री. राजकारणाविषयी म्हत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार या प्रधाना कडे सोपविण्यात आले होते. महाराजांनी दत्ताजी त्रिंबक याला म्हणून नेमले होते.
५) सेनापती
हा लष्करचा प्रमुख असून राज्य रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. युद्ध प्रसंगी हजर राहणे हे, त्याचे कार्य आद्य कर्तव्य होते. शिवाजी महाराजांनी हंबीरराव याला सेनापती पद दिले होते.
६) पंडितराव
या प्रधानाला धर्म विषयक सर्व अधिकार देण्यात आले होते. त्याच प्रमाणे विद्वानांचा सत्कार करणे, अंनुष्ठान करणे, दान धर्माची आखणी करणे, इत्यादि कामे त्यांच्यावर सोपविली होती. महाराजांनी रघुनाथ पंडित यांची पंडितराव म्हणून नियुक्ती केली होती.
७) न्यायाधीश
न्यायदानाची जबाबदारी यांच्यावर असून निवाडापत्रावर यांचे संमती चिन्ह आवश्यक मानले जात असे. या पदावर निराजी रावजी यांची नेमणूक शिवाजी महाराजांनी केली होती.
८) सुमंत
परराज्याशी सामान्य व्यवहार करण्यासाठी या प्रधानाची नियुक्ती करण्यात आली होती. महाराजांनी रामचंद्र त्रिंबक यास सुमंत म्हणून नेमले होते.
या सर्व प्रधानाचे वेतन निच्छित करण्यात आले होते.
१) पेशव्यास दरवर्षी १५.००० होन,
२) आमात्यास दरवर्षी १२.००० होन,
असे वेतन ठरविण्यात आले होते. इतर प्रधानांना दरवर्षी १०.००० होन असे वेतन निच्छित करण्यात आले होते. प्रत्येक प्रधांनाला ८ कारकुण म्हणजे अधिकारी देण्यात आले होते. १) दिवाण २) मुजूमदार ३)फडणीस ४) सबणीस ५) कारखानीस ६) चिटनीस ७) जामदार व ८) पोतनीस या ८ अधिकार्यांचे वेतन ही निच्छित करण्यात आले होते. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचे प्रशासन जास्तीत जास्त निर्दोष आणि स्वच्छ असले पाहिजे म्हणून काही दंडक घालून दिले होते. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी प्रधानांचे आणि अधिकार्यांचे पगार निच्छित केले. त्यांच्या बढती चे व बडतर्फी चे अधिकार स्वतः कडे ठेवले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा