मृत्यूनंतर

' मरणात  खरोखर जग जगते...'.

वारंवार वाचणार्याला या वाक्यात विरोधाभास आठवले .

मरणामुळे जगातल्या व्यक्ती नामशेष होतात, स्मृतीतून देखील त्या नाहीशा होतात.परंतु येथे कवी म्हणतो की, मरणाने तर जगातील व्यक्ती जगतात. खोल विचार केला तर त्याचे म्हणणे खरे आहे! मरणानंतर च माणसाला अमर पद मिळते . परंतु सामान्य माणूस मृत्यूनंतर विसरला जातो. पण सत्कार्यसाठी मरण आले , तर त्यामुळे मनुष्य अमर होतो.

     पण हे अमर पद  मिळवण्यासाठी माणसाला त्याग करावा लागतो , त्याशिवाय कीर्ती मिळत नाही.चंदन स्वतः झिजते व दुसऱ्याला सुगंध देते. सर्वस्वाचा त्याग चा नव्हे तर  आत्मयज्ञ करायला माणसाने तयार राहिले पाहिजे.

मरावे परी कीर्ती रूपे उरावे ।

या सामर्थ्य च्या उक्तीतही हीच गोष्ट सांगितली आहे.

मृत्यू मुळे शरीराने मनुष्य नाहीस झाला , तरी त्याने केलेल्या बहुमोल कार्यासाठी तो कीर्ती रूपे तो जिवंत राहतो.

संभाजीने धर्मा साठी मृत्यू परकरला ,

लोकमान्य टिळक , महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सारख्या त्यागी देशभक्तांच्या प्रचंड देश कार्यामुळे आज त्यांच्या स्मृती आपण अहनिर्षं जगवितो आहोत.

मृत्यू कोणासाठी कोणत्या कार्यासाठी आला यावर त्याचे मोठेपण अमरपण  लाभत असते......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप